न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २२ फेब्रु.) :- “ज्योतं तेवूंया त्यांचेसाठी “ या कार्यक्रमा अंतर्गत पुलवामां येथें नुकत्यांच झालेल्यां दहशतवादी भिषणं हल्यांत धारातीर्थी पडलेल्यां हुतात्मां जवानांना प्रयास ग्रुप (महिलांचे खुलें व्यासपीठ) चिंचवड यांच्या वतीने जिजामांता उद्यांन येथे आदरांजली अर्पण करणेत आली. प्रारंभी कार्यक्रमाचें प्रास्तांविक सेक्रेटरी माधुरी कवी यांनी आत्मघातकी भिषणं हल्ला व त्याचें उमटणांरे पडसांद याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका सौ. अश्विनी चिंचवडे यांनी “अमर ज्योतं प्रज्वलींत केली. या प्रसंगी आदरांजलीचा आजचा प्रयास ग्रुपचा आज महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा चिंचवड वासीयांना निश्चीतय प्रेरणादायी व आदर्श देणारा असून, हुतात्मा जवानांनी केलेले देशासाठी आपुल्या प्राणांचे केलेले बलिदानाचे महत्व प्रयासने एका अर्थाने समाजास जागृत केले आहे. असे म्हणावे लागेल, असे त्यांनी मत नमूद केले. जवानांना सुखशांती व सदगती मिळणेसाठी मान्यवरांनी व ग्रुपच्या सभासदांनी ‘महामृत्युंजय जप व ‘विरगान‘ गाऊंन श्रद्धांजली अर्पण केली.
केंन्द्रिय रिझर्व्ह पोलिस दलाचे रिटायर्ड हनुमंत साळुंखे यांनी दहशतवादी हल्ल्यांचा निषेध, हल्ल्यांचे गंभीर स्वरूप, सिमेवरील जवानांची कसोटी व त्यांची शोकातीका विषद केली. ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ यांनी धारातीर्थी पडलेल्यां जवानांचे बलिदांन हे व्यर्थ न सरकार त्याला योग्य न्याय देईल अशी आशा व्यक्त करूंन सरकार लवकरच या संबधी ठोसं भूमींका घेईल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमरजीकर यांनी काश्मीरची सध्याची परीस्थीती व भारत व पाकिस्तानचे परस्पर संबंध यावर विशेष भर देऊन भारताने लवकरच पाकिस्तानबरोबर असणारे संबंध संपवावेत, असे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येंने नागरीक व महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुजाता कुलकर्णी, गायत्री पेंढारकर, दिपाली खासनिस, निलीमा कांबळे, गीतांजली बावळे, संध्या कुलकर्णी यांनी परीश्रम घेतले, असे प्रयास ग्रुप चिंचवडच्या अध्यक्षा शोभा निसळ यांनी सांगितले.