- उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने संविधान दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२३) :- भारताची लाेकशाही ही संविधानामुळे टिकून आहे. संविधानाचे रक्षण करणे नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संविधानामुळेच सामान्य नागरिकांना हक्क, महिलांना शिक्षण, नाेकरीमध्ये संधी उपलब्ध झाली, असे प्रतिपादन उन्नती साेशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने संविधान दिवस गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे बोलत होत्या. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशन संस्थापक संजय भिसे, मनाेज ब्राह्मणकर, सागर बिरारी, राकेश वाणी, राजेंद्रनाथ जसवाल, उत्तम धनवटे, वालमीक काटे, विठाई वाचनालयाचे, आनंद हास्य क्लब व जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित हाेते.
डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधाना मुळेच लाेकशाहीत प्रत्येकाला समान नागरी हक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणी मोठा-कोणी छाेटा असा भेद नाहिसा झाला. सामान्य नागरिकाला सुध्दा त्याचे मत मांडण्याचा अधिकार मिळणं आहे. कायदा हा सर्वांसाठी सामान आहे. त्यामुळे भेदभाव, उच्च नीच हे अंतर नाहिसे झाले आहे.