- शहरात पहिल्याच दिवशी मिळाला अनेकांना लाठ्यांचा प्रसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ११ वाजता संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी काही माहित नसल्याचा आव आणत अनेकांनी पोलिसांना मिळेल ते कारण सांगत दंडात्मक कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकारी रंगनाथ उंडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी नागरिकांना समजावून सांगत कारवाई करत पुन्हा संचारबंदीचे उल्लंघन करू नका, अस ठणकावून सांगितलं.
दरम्यान अनेक विनामास्क दुचाकी चालकांनी नाकाबंदी दरम्यान पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काहींना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद मिळाला. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.