न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- शहरात कच-याचे जागोजागी ढिग पडले आहेत. अनधिकृत बांधकाममे, शास्तीकर, संरक्षण हद्दीतील रस्त्याचा प्रश्न, रेडझोन यासह आदी प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक न करता केवळ भूलथापा देवून पिंपरी चिंचवडकरांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेत मुख्यमंत्र्याचा शहरवासियांवर गाजराचा पाऊस होईल, सत्ताधाऱ्यांकडून वेगळी अपेक्षा तरी काय? असा सवाल सत्ताधाऱ्यांना महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने विचारला आहे.
दत्ता साने यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना भावनिक भूलथापा करीत, महापालिकेच्या निवडणुकीतही सत्ता द्या, शंभर दिवसात सगळे प्रश्न सोडविता, अशी आश्वासने दिली. आजही शहरातील प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. लोकांची घरे अद्याप अधिकृत झालेली नाहीत. शास्तीकर संपुर्ण माफ केलेला नाही. याशिवाय अन्य प्रश्नाकडे भाजप नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे.
सत्ताधाऱ्यांना पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नाचे काहीच देणं-घेणं नाही. त्यांना आमचे जाहीर खुले आव्हान आहे. आमच्या शहरासाठी काय करणार ते सांगा, शहरातील पाणी, कचरा, स्वस्तात घरे, शिक्षण, सुरक्षितता, जेष्ठांच्या सुविधा, ना भय, ना भ्रष्टाचार मुक्त कारभार, गुन्हेगारी यावर तुम्हा बोला, शहराचे प्रश्न अद्याप का? प्रलंबित ठेवले, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार दत्ता साने यांनी पत्रकात केला आहे.