न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हें.) :- ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने येत्या २७ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आर.टी.ओ. कार्यालयावर एकाच वेळी तीव्र मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र कृती समिती सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली आहे.
रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, कोल्हापूर रिजनमधील मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावे, बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यात यावे, इन्शुरन्सचे वाढलेले भरमसाठ दर रद्द करण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व आर.टी.ओ. कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.
पश्चिम भागातील रिक्षा चालकांची भूमिका ठरवण्यासाठी रिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक न्यू करवीर रिक्षा संघटना कार्यालय बिंदू चौक येथे पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे, उपाध्यक्ष गफारभाई नदाफ, सहसचिव महेश चौघुले, सदस्य फिरोज मुल्ला, आनंद तांबे, शिलताई डावरे, राजेंद्र थोरवडे, महादेव विमुते, राजेश बुटाले, माणकेश्वर बेलूर, सुरेश गलांडे, नंदाताई साळुंखे, सुनिल पाटील, फिरोज काची, प्रकाश चव्हाण, तुषार मोहिते, राजू रसाळ, अरताफ खताळ, गजानन विभूते, सुभाष सुर्वे, बंडू तोडकर, मैला पटेल आदी उपस्थित होते.
कृती समितीच्या राज्य कार्यकारणी पदी राजेंद्र थोरवडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी महादेव विभूते, सांगली जिल्हा निरीक्षक पदी सुभाष सुर्वे, सातारा जिल्हा निरिक्षकपदी गजानन विभूते यांची या वेळी नियुक्ती करण्यात आली. नवीन पदाधिकारी यांचा गफरभाई नदाफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, असे कोल्हापूर जिल्हा कृती समिती अध्यक्ष महादेव विभूते यांनी सांगितले.