न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १५ नोव्हें.) :- तळेगाव एमआयडीसी येथील टप्पा क्र. चार मधील शेतकऱ्यांनी भू-संपादनाला शासनाने दिलेल्या एकरी ६६ लाख ३६ हजार ५५२ या दराला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.
एकरी सव्वा कोटी दर देण्यावर शेतकरी ठाम आहेत. प्रस्तावित भू-संपादनाठी जिल्हाधिकारी नलकिशोर राम यांच्या बरोबर शेतकऱ्यांची बैठक झाली मात्र, नुकसान भरपाईच्या रकमेवर एकमत न झाल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली.
यावेळी आमदार संजय भेगडे, शांताराम कदम, भिकाजी भागवत, दत्ताञय पडवळ, शिवाजी भेगडे यांनीही बाजू मांडली. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचा विचार करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांना दिले. बाळा भेगडे, शोभाताई कदम, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासो. काकडे, सुदर्शन खांडगे, भिकाजी भागवत, दत्तात्रय पडवळ, सुदाम कदम, मोहन घोलप, ऍड. सोमनाथ पवळे, बबुशा भांगरे व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
एम. आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. मावळचे उप विभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी आभार मानले.