न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- आषाढी वारी निर्णय घेण्यासाठी आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉल येथे बैठक पार पडली. या बैठकीत यंदा पायी पालखी सोहळा होणार नसल्याचं निश्चित झालं आहे.
यंदाच्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पादुका घेऊन कमी लोकांमध्ये वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमान या तीन पर्यांया पैकी एकाद्वारे त्यावेळीच परिस्थिती पाहून, पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थान प्रमुख विकास ढगे आणि देहू देवस्थान प्रमुख अभय टिळक यांनी दिली.
या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहुवरून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.