न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- एस. टी. वाहतूक सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, कामगार व अन्य पासधारकांना त्यांच्या शिल्लक प्रवासी पासची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वल्लभनगर आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २२ मार्च २०२० पासून आजपर्यंत राज्यातील सार्वजनिक वाहतुकीबरोबरच एस. टी. महामंडळाची वाहतूक बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या आगोदर ज्या विद्यार्थी, कामगार व अन्य प्रवाशांनी आपले पास काढले होते. त्या प्रवाशांना बस बंद असल्यामुळे पासद्वारे प्रवास करता आलेला नाही. त्यामुळे बसची सेवा पूर्ववत झाल्यानंतर पासधारकांना पासची जेवढे दिवस मुदत शिल्लक राहिली होती: तेवढ्या दिवसाचा प्रवास करण्याची मुदतवाढ द्यावी. पुढील काही दिवसांत शाळा, महाविद्यालये सुरू होणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी पासधारकांना मुदतवाढ देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, श्रीकांत गोरे, तेजस गवई, सतीश घावटे, साहेबराव सालुंके, मोहसिन शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.