न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- दुपारच्या वेळेत अचानकपणे १५ ते २० माकडांच्या टोळीचे भोलेनाथनगर नांदेड (सिंहगड रोड) या रहिवाशी नगर येथे आगमन होते. संख्या जास्त असल्याने थोडा वेळ रहिवास्यांमध्येही थोडा तणाव निर्माण होतो. पण थोड्याच काळात त्यांनी चेरीच्या झाडावर बसून चेरीचा ताव मारण्यात ते गुंग होतात व नंतर विजेच्या खांबांचा सहारा घेऊन माकड उड्या मारतात आणि तासाभराच्या मुक्कामानंतर ते इमारतींच्या छताचा सहारा घेऊन ते तेथुन निघून जातात.
या संदर्भात प्रत्यक्षदर्शी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले,” कोरोना काळात जूनमध्ये निसर्ग हिरवाईने, झाडांनी,फळ आणि फुलांनी नटलेला आहे. नागरिकांचा हस्तक्षेप व वर्दळ कमी झाल्यामुळे प्राणीही आता मुक्त संचार करू लागले आहेत. मुक्त संचार करीत असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता हे प्राणी पुन्हा आपल्या जंगलात म्हणजेच त्यांच्या रहिवाशी विभागात परत जात आहेत. त्याचेच उत्तम उदाहरण आपल्या पुण्यात पहावयास मिळाले.”