- वीज बिलाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडवणीस यांचा राज्य सरकारवर संताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे.
ज्यांनी विज बिल वापरली त्यांनी विजेची बिलं भरावी याच दुमत नाही, पण ज्यांनी वापरलीच नाही, जी वीज वापरलीच नाही त्यांचं बिल का द्यायचं? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, सरकारमधील विसंवादावर बोलताना, तुम्हाला ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाच मिटवा, असे फडणवीस यांनी म्हटले.
विज बिलाच्या सवलतीवर एकमताने निर्णय का झाला नाही. राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्टेटमेंटचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी अद्याप का निर्णय घेतला नाही. या सर्वच नेत्यांच्या संवादात कुठेही एकमत दिसत नसल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं.