वाहतुकीची अट शिथील न केल्यास लघुउद्योग सात दिवस बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- लॉकडाऊनमध्ये औद्यागिक वसाहतीमधील कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, कारखानदारांवर कामगारांची ने – आण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मात्र, जवळपास ९५ टक्के कामगार स्वत:च्या वाहनाने येत आहे. त्यामुळे या निर्बंधांमधून लघुउद्योगांच्या वाहतुकीची अट शिथील न केल्यास जिल्ह्यातील सर्व लघुउद्योग सात दिवस बंद ठेवावे लागतील.
कारखानदारांनी कामगाराच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहता, बड्या कंपन्यांमधील कामगारांना बस सुविधा पुरविली जाते. तर अधिकारी वर्ग स्वत:च्या खासगी वाहनाने येतात. याशिवाय लघुउद्योगांमधील कामगार मात्र सायकल, दुचाकी, बस आणि काही जण तर पायी कामावर येतात, त्यामुळे अडचण निर्माण होण्याची देखील शक्यता असल्याने जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी अप्पासाहेब शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.