विद्यार्थी, नोकरदार, कामगार वर्गाला चिंतेने घेरले..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुढील सात दिवस पीएमपी बस बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी याचा फटका हा विद्यार्थी, नोकरदार आणि कामगार वर्गाला बसणार आहे.
पुणे ते पिंपरी-चिंचवड रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. अशा नागरिकांनी कामाच्या ठिकाणी कसे जायचे असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. मागील वर्षी जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसमधून प्रवास करण्यास परवानगी होती. त्यावेळी सामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला होता.
मागील काही दिवसांपासून खासगी कॅब आणि रिक्षावाले अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. प्रत्येकाला तेवढे पैसे देणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने कमी प्रवासी संख्येत का होईना बस सुरु ठवणे आवश्यक होते, असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत. क्षमतेच्या पन्नास टक्केच प्रवाशांना परवानगी होती. रुग्णसंख्या पाहता बसमधील रोजची गर्दी कमी झाली होती. त्यामुळे सरसकट बस बंद केल्याने सामान्यांना त्रास होणार आहे.