- दैनंदिन नियमावली जैसे थे; मुख्यमंत्र्यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मे. २०२१) :- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे १५ मे पर्यंत कायम होते, त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून १ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे.
या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी ४८ तास आधी कोरोनाची आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.
किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन, मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने व येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी ७ ते ११ या दरम्यान सुरु राहणार आहेत.