- मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीद्वारे होणार पाल्यांचा तात्पुरता प्रवेश निश्चित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची लॉटरीव्दारे निवड झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून प्रवेश निश्चित करता येणार आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करून नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे. त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीची मुदत आरटीई पोर्टलवर द्यावी. ज्या विद्यार्थ्यांचा लॉटरीत नंबर लागला आहे, त्याच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्यांचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.
प्रवेश मिळावा यासाठी अर्ज भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा इतर कागदपत्रांवरून शाळा व निवासी अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये.