- पहिली ते पाचवी १५६ व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३४ रुपये भत्ता..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळत असतो. यामुळे पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बँक खाते काढावे लागणार आहे.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३४ रुपये मिळणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वाटप केले जाते. शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून यंदाच्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक विशेष कल्याणकारी उपाय म्हणून म्हणून डीवीटीद्वारे बैंक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पात्र विद्यार्थ्यांना आधार लिंक बैंक खाते अद्ययावत करावे. ज्या विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही. अशांना खाते उघडण्याबाबत शाळांनी पालकांना सहकार्य करावे, असे परिपत्रक राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी काढले आहे. शहरात पहिली ते आठवीपर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे यातील ज्या विद्यार्थ्यांनी बँकेत खाते काढलेले नाही, त्यांना खाते काढावे लागणार आहे.