- पालिकेत राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानाची अंमलबजावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण होणे व त्याला वेळेत प्रतिसाद देण्यासाठी कार्यप्रणाली अवलंबवायला हवी, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २० ऑगस्ट २०२१ पासून एक वर्ष कालावधीमध्ये राजीव गांधी प्रशसकीय गतिमान अभियान राबविण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याबाबतची सर्व विभाग प्रमुखांची नियोजन बैठक महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस उपमहापौर नानी घुले, स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आशादेवी दुर्गुडे, सुभाष इंगळे, अजय चारठणकर, मनोज लोणकर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, निलेश देशमुख, सहशहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, संदेश चव्हाण, आदी उपस्थित होते.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाचा कृती कालावधी २० ऑगस्ट २०२१ ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान असणार आहे. तर या स्पर्धेचा कालावधी २० ऑगस्ट २०२१ पासून एक वर्षाचा असणार आहे. यामध्ये ७ निकषांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, नागरिकांचा मनपाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. मनपाच्या प्रत्येक विभागामध्ये येणा-या नागरिकाला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचा महानगरपालिकेकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या माध्यमातून गतिमान कामकाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी महानगरपालिकेला मिळाली आहे. नागरिकांच्या तक्रारींवर आपण किती तत्परतेने कार्यवाही करतो हे पाहणे आवश्यक आहे. मनपामध्ये आल्यानंतर आपले काम होईल का?, आपल्याला कामासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत ना? हि लोकांची भावना बदलणे आवश्यक आहे. प्रशासनामध्ये गतिमानता आणणेसाठी जागतिक दर्जानुसार सेवा देणे आवश्यक आहे तसेच कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढविणे देखील आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणे अथवा त्यावर त्वरित प्रतिसाद देणे शक्य आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर देखील त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी या अभियाना अंतर्गत करण्यात येणा-या विविध निकषांचे सादरीकरण केले. यामध्ये अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त राजेश पाटील यांनी ७ कमिट्यांची स्थापना केली आहे. यामध्ये कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये संकल्पना व पद्धतीचा अवलंब कमिटीमध्ये उपआयुक्त सुभाष इंगळे, स्मिता झगडे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, सेवांची गुणवत्ता/दर्जा यामधील वाढ व उपक्रमांची परीणामकारकता तपासणेसाठी उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, लोकाभिमुखता कमिटीमध्ये उपआयुक्त अजय चारठणकर माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार, अनिता कोटलवार, संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर कमिटीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सहशहर अभियंता रामदास तांबे, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, तंटा/तक्रार मुक्त कार्यालय कमिटी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त अजय चारठणकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार, नाविन्यपूर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना/प्रयोग/उपक्रम कमिटीमध्ये मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, सहशहर अभियंता अशोक भालेकर यांची नियक्ती करण्यात आली आहे.