- अन्यथा लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतुन रद्द होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निमुर्लन व पुनर्वसन विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत असुन या योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणेसाठी अंतिम मुदत दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत असुन कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यास सदर लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतुन रद्द करण्यात येईल. या योजनेत निवड झालेल्या व अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र सादर करावीत, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
योजनेत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी रावेत येथे ९३४, बोऱ्हाडेवाडी येथे १२८८, चऱ्होली येथे १४४२ असे एकुण ३६६४ सदनिका वाटप करणेसाठी योजना राबविणेसाठी मान्यता देण्यात आली आहे.
निवड झालेल्या परंतु कागदपत्रे सादर करणे करीता उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या नोटीस बोर्डवर लावणेत आली असुन महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php) देखील सदर यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.