- खा. संजय राऊत यांचे किरीट सोमय्यांना पत्र..
- पालिकेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करा; राऊतांचे सोमय्यांना खुले आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) किरीट सोमय्या यांना एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा. असं संजय राऊत यांनी पत्राद्वारे आवाहन केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.
sent following letter to 'Scam crusader'@kiritsomaiya.it gives details of misappropriation of Funds to the tune of 500 cr Rs in the smart city project run by Pimpari chinchwad corporation ruled by BJP.Hope he will use his influence on ED to start the investigation.@NirajGunde pic.twitter.com/sPiSKSjGTH
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 20, 2021
संजय राऊत आपल्या पत्रात म्हणतात, ‘सर्वच ठिकाणचे घोटोळे उघड करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण केली आहे. मागील अनेक वर्षांपासून तुम्ही हे करत आहात. सरकारी पैसा आणि मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले. खरं तर, अनेक सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना तुम्ही त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघड केल्यानंतर तुरुंगात जावं लागलं आहे.
“पिंपरी चिंचवडमध्ये ७०० कोटींचा घोटाळा दिसतोय. स्मार्ट सिटी हा केंद्राचा प्रकल्प आहे. देशभरात या प्रकल्पात जे घोटाळे सुरू आहेत, त्यातला एक शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी समोर आणला आहे. पण कुणी दखल घ्यायला तयार नाही. तुम्ही महाविकासआघाडीच्या ५० लाख, १० लाखांवर चौकशी करत आहेत. कायदेशीर व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. किरीट सोमय्या हे सगळं करत आहेत. पंतप्रधान म्हणतात जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मग हा देखील जनतेचाच पैसा आहे. ती सगळी फाईल आम्ही भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे शिरोमणी असलेल्या किरीट सोमय्यांना पाठवली आहे. आता त्यांनी हा घोटाळा बाहेर काढावा आणि संबंधितांना तुरुंगात पाठवावं”, असं राऊत म्हणाले.
२०१८-१९ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला ५०० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, टेंडर आणि यातील अटी क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आल्या. ‘या कंपनीला ५०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी ५० टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीची मागणी करा, असा उपरोधिक टोलाही पत्रात राउत यांनी लगावला आहे.