न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) :- शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत संभ्रम आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत.
अखेरपर्यंत म्हणजे कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. तसेच दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमासही ते प्रमुख पाहुणे होते. मात्र २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान ”बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवडाभरापासून दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल आहेत. प्रकृती खूप खालावलेली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.”, अशी माहिती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली आहे.