- नागरी समस्यांवर केले लक्ष केंद्रित; भाजपवर ट्विटद्वारे घणाघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- पार्थ पवार सध्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष देताना दिसून येत आहेत. त्यांनी शहरातील समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
पिंपरी चिंचवडमधील नागरिक घराबाहेर पडताच त्यांचे तुटलेले रस्ते, खड्डे, सतत प्रलंबित असलेले विकास प्रकल्प यांनी स्वागत होते. सत्ताधाऱ्यांनी नियोजित शहराला अवशेष बनवेले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका शहराचा विकास करण्याचे सोडून स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
”शहरातील खड्डे, वाहतूककोंडी, अदृश्य सिग्नल, भीषण अपघात अशा समस्या शहरात निर्माण झाल्या आहेत. या स्मार्ट सिटीत नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. ही तर महापालिकेने विकासाच्या नावाखाली नागरिकांची केलेली फसवणूक असल्याचे ट्विट पार्थ पवार यांनी केले आहे.
As soon as people of Pimpri Chinchwad step our of their homes, they are welcomed by broken roads, potholes, ever pending developmental projects, absent traffic lights. A planned city has been turned into ruins. Ppl of PCMC will reject those who turned city into personal fiefdom. pic.twitter.com/oVZnvxVMmp
— Parth Pawar (@parthajitpawar) November 24, 2021