न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२२) :- टपाल कामगार संघटनांनी (दि. २८ व २९) रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये टपाल कामगारांच्या सर्व मान्यता प्राप्त संघटनांनसह इतर खाजगी व सरकारी सर्व संघटनांनी सहभाग घेतला आहे.
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करा, खाजगीकरणाच्या हालचाली थांबवा व डाक मित्र योजना मागे घ्या, संघटनेच्या प्रतिनिधींना दोन टर्म पदावर राहण्यासाठी निर्बंध घालण्याचे आदेश मागे घ्या, पार्सल वितरणासाठी सुरू केलेली नोडल डिलिव्हरी बंद करा, कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्याचे थांबवा, कोव्हीड च्या साथीमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत देऊन त्यांच्या घरातील एका व्यक्तीला कामावर त्वरित घेण्यात यावे, ग्रामीण डाक सेवक कर्मचारी साठी कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारशी त्वरित मान्य करा, फिनॅकल सर्व्हरची क्षमता वाढवा, थकीतअठरा महिन्याचा महागाई पत्ता त्वरित कर्मचाऱ्यांना द्यावा यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
के एस पारखी प्रादेशिक सचिव नॅशनल असोशियन ऑफ पोस्टल एम्प्लाइज, राजेंद्र करपे महाराष्ट्र सर्कल सचिव नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक, देवदास देवकर प्रादेशिक सचिव नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन व एम टी एस, अमृता नेगीनहल सप्रे नॅशनल युनियन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन युनियन, एस बी कारले नॅशनल युनियन ऑफ मेल मोटर सर्विस यांनी माहिती दिली असून सर्व टपाल कर्मचाऱ्यानी संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.