- दिनेश यादव यांची महावितरणकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- कुदळवाडी चिखली परिसरातील सर्व भागात वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात नागरिकांना लहुउद्योजकाना होत असुन यांचा आर्थिक मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे वेळेवर बील भरणार्या नागरिक महावितरणच्या या गोष्टी मुळे हैराण झाले आहेत
कुदळवाडी परिसरातील रहिवासी भागाला औद्योगिक विज वाहिन्यांपासून वेगळे करा अशी मागणी वारंवार माजी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरणकडे केली आहे
विद्युत पुरवठ्यातील व्यत्यय अडचणीचा ठरत आहे,याशिवाय नागरिकांना प्रचंड उन्हाळ्यात विज नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे., त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने रहिवासी भागांसाठी स्वतंत्र विज वाहिन्यांची व्यवस्था करून अखंडित विज पुरवठा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन यादव यांनी केले आहे.