- सोबत दवाखाना, मुलांचे शिक्षण आणि प्रवास खर्चाचाही अंतर्भाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांसाठी योजना आहे. ही मूळची टाटाची योजना असून पोस्टाच्या माध्यमातून ही पॉलिसी विकली जात आहे. त्यासाठी पोस्टाने टाटा कंपनीबरोबर करार केला आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते काढणे, पॉलिसीबाबत ग्राहकांना समजावून सांगून पॉलिसी विक्री करणे. क्लेमबाबत सेवा देणे या सेवा पोस्ट पुरवणार आहे. अतिशय कमी प्रीमियममध्ये टाटाने ही पॉलिसी देऊ केली आहे. एक वर्षासाठी ३९९ रुपये भरून दहा लाखाचा विमा ग्राहकांना देऊ केला आहे. दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करून त्याचा लाभ घेता येतो.
अपघात विम्यात मिळणारे लाभ, प्रत्येक इंडिया पोस्ट पेमेंट बँक खातेधारक पॉलिसी घेऊ शकतो. ग्राहकांना पोस्ट पेमेंट बँकेत नवीन खाते काढावे लागेल. अथवा खाते असल्यास किमान ४०० रूपये खात्यावर शिल्लक असणे गरजेचे. इंडिअन पोस्ट बँक खातेधारकाने पॉलिसी विकत घेतल्यावर ग्राहकांच्या खात्यामधून पैसे घेतले जातील. पॉलिसी ग्राहकांच्या मेलवर पाठवली जाईल.
अपघाती मृत्यू आल्यास १० लाख रुपये. कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये. दवाखाना खर्च ६० हजार रुपये. मुलांचा शिक्षण खर्च १ लाख रुपयांपर्यंत. रुग्णालयात अॅडमिट असेपर्यंत दररोज १००० रुपये (१० दिवस). ओपीडी खर्च ३०,००० रुपये. अपघाताने अर्धांगवायू आजाराचा त्रास झाल्यास १० लाख रुपये. कुटुंबासाठी दवाखाना प्रवासखर्च २५००० रुपये. वय १८ ते ६५ वर्षे. सर्वांना ३९९ रुपये वार्षिक हप्ता. सर्व प्रकारच्या अपघातांचा या विमा सेवेमध्ये अंतर्भाव असेल.
ही टाटाची योजना असून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पॉलिसीची विक्री केली जात आहे. त्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढणे, पॉलिसी विक्री करणे, विक्रीपश्चात सेवा देणे ही कामे पोस्ट खात्याकडून केली जात आहे. कमी प्रीमियममध्ये अधिक लाभ देणारी ही अपघात विमा योजना असून गेल्या दहा दिवसात पिंपरी चिंचवडमधील ३२ पोस्ट कार्यालयातून सुमारे दीडशे पॉलिसीची विक्री झाली आहे. पॉलिसी पोस्टमनद्वारेही विकली जाते. घरपोच सेवा दिली जात आहे. – के. एस. पारख – अधिकारी पोस्ट खाते जनसंपर्क…