- राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली होती. त्यानंतर त्यांनी सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय हा तज्ज्ञ, संस्थाचालक आणि शिक्षकांशी बोलून घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी दिली.
पुण्यातील खासगी शाळेतील शिक्षक संवाद आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात शालेय शिक्षण मंत्री केसरकर बोलत होते. ते म्हणाले, लहान मुलांना झोपेची जास्त आवश्यकता असते. या मुलांची शालेय जीवनातील वर्षे महत्त्वाची असून त्या काळातच मेंदूचा जास्त विकास होतो. मात्र, राज्यात शाळांच्या वेळा सात वाजल्यापासून असतात. याचा त्यांच्यावर मानसिक ताण जादा येतो.
शहरांमध्ये दोन ते तीन पाळ्यांत शाळा सुरू असतात. त्यामुळे त्यामुळे या मुलांची व्यवस्थित झोप होउन, त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करता सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.