- वृक्ष संरक्षक जाळीमुळे विद्यार्थ्यांच्या कोमल मनावर परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- आकुर्डीतील म्हाळसाकांत शाळेच्या गेटच्या बाहेर असलेल्या झाडावर जाहिरातीच्या बोर्डाचा रिकामा सांगाडा लटकलेल्या अवस्थेत आहे. तो कोणत्याही क्षणी खाली पडून गंभीर अपघात होऊ शकतो. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिका केवळ अनधिकृत जाहिरातीचे फलक हटविण्याची तोंड देखली कारवाई करताना दिसून येते. मात्र अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होते. शाळेत दररोज हजारो विद्यार्थी येत असतात. त्यामुळे हा सांगाडा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून दुर्घटना घडू शकते. पालिका प्रशासनाने वेळीच कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे.
तसेच या झाडाला वृक्ष संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. झाडाची संपूर्ण वाढ होऊनही ही वृक्ष संरक्षक जाळी हटविण्यात आलेली नाही. येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलांचे याकडे लक्ष जाते. त्यांच्या कोमल मनावर याचा परिणाम होतोय. झाडाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी ही वृक्ष संरक्षक जाळी हटविण्याची मागणी पालक करीत आहेत.