न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खडकी (दि. १५ मार्च २०२३) :- आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था मध्ये शेतकऱ्यांचे मोठे स्थान आहे. आज बळीराजा सर्वांचा पोषणहार आहे. बळीराजा सुखी असला तर देश सुखी होण्यास आणखी मदत मिळेल असे गौरवउद्गार असे मराठी चित्रपटाचे निर्माता, अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांनी काढले.
३५-३७ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांच्या वतीने शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट “रौंदळ” मुळशी येथील गावांमधील आदिवासी मुलांना व अनिकेत सेवा भावी संस्थेतील आश्रमातील अपंग, अनाथ मुलांसाठी आयोजित करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे अभिनेते यश डिंबळे, दिग्दर्शक गजानन पडोळ, फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड, भरत पवार उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सत्य परिस्थिती वर आधारित नुकताच रिलीज झालेला ‘रौंदळ’ हा मराठी चित्रपट मुलांना मोफत दाखविण्यात आला. चित्रपटामध्ये मधील अभिनेते आणि खलनायक तसेच दिग्दर्शकांनी देखील सर्वासोबत चित्रपटाचा आनंद लुटला. चित्रपटानंतर चित्रपटातील अभिनेतेच साक्षात सर्वांसमोर आल्यामुळे उपस्थितांनी मोठा जल्लोष करण्यात आला. सर्व मुले अभिनेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक झाले होते. सर्वांसोबत हसतमुखाने अभिनेत्यांनी फोटो काढले, यावेळी घनश्याम काकडे, अविनाश होडगे, निवास राठोड, रोहित वाघमारे, समीर वाघमारे उपस्थित होते.