न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च) :- शिवसेना युतीवर रामदास आठवले नाराज, हे प्रसार माध्यमातून समजल्याने हासाव की रडाव हे कळले नाही. वास्तविक पाहता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युती झाली आहे. पण युतीतील आणखी एक मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपा युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये, असा इशारा दिला होता. आठवले यांनी युतीवर नाराजी वैयक्तिक स्वार्थापोटी व्यक्त केली आहे. तसेच ”तुम्ही आमचा आदर करा आणि आमच्याकडून आदराची अपेक्षा करावी”, असेही त्यांनी शिवसेना- भाजपाला सुनावले होते. याचा खरपुच समाचार मातंग समाजाचे नेते युवराज दाखले यांनी घेतला आहे.
परंतु, आरपीआय नेते रामदास आठवले यांनी आपल्या दलित (बहुजन) मतामध्ये मातंग समाजाला ग्राह्य धरू नये, असा इशारा लहुजी शक्तासेना शहर प्रमुख युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. राज्यात शिवसेना- भाजपा युती असून, लोकसभा निवडणूक भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाला दुय्यम स्थान दिले. जागा वाटपाचा हा निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते, असेही म्हणाले आहेत. परंतु, आठवले साहेबांनी स्वतः आत्मपरिक्षण कराव की, आपण किती बहुजन समाजातील मातंग समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मातंग समाजाचा वापर आठवले साहेबांनी केलेला आहे.
रामदास आठवले साहेबांनी अखंड महाराष्ट्रातील बारा-बलुतेदार समाज बांधवांसाठी प्रगतीच्या दृष्टिकोनातून उघड्या डोळ्यांनी काम करणे सर्व बहुजन सामाज बांधवांना अपेक्षित आहे. मुंबई उत्तर पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. दुसऱ्याच्या कुबड्यावर उभे राहण्यापेक्षा स्वतःच्या आरपीआय पक्षाच्या वतीने निवडणुक लढवण्याची हिम्मत तप्तरता त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी दाखवावी, असे या पत्रकात दाखले यांनी म्हटले आहे.