न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२३) :- बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्याप्रकरणी बांगलादेशी तीन नागरिकांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने बोऱ्हाडेवाडी मोशी येथे सोमवारी (दि. १८) दुपारी ही कारवाई केली.
सुकांथा सुधीर बागची (२१), नयन बिंदू बागची (२२), सम्राट बलाय बाला (२२, तिघे मूळ रा. बहादूरपूर. पो. दत्तोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली की, बोऱ्हाडेवाडी मोशी येथे एका बांधकाम साइटवर काही जण बांगलादेश येथून येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने बोऱ्हाडेवाडी येथील सह्याद्री बांधकाम साइटवरील लेबर कॅम्पमध्ये सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. हे तिघे जण भारत- बांगलादेश सीमेवरील घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले असल्याचे चौकशीत समोर आले. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. मुलकी बांगलादेशी चलन, भारतीय तीन फोन जप्त केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत.