- अन्यथा आजार आणखी वाढण्याचा धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- शहरातील गृहनिर्माण संस्थांना इमारतीवरील टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. या टाक्या वर्षातून दोन वेळा साफ करण्याचा नियम असतानाही गृहनिर्माण सोसायट्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे टाकीमधून दूषित पाणीपुरवठा होऊन घरातील सदस्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले.
सोसायट्यांच्या गच्चीवर व भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाक्या अनेक वर्षे साफ केल्या जात नाहीत, या टाक्यांमध्ये पालापाचोळा, शेवाळ, माती, दगड साचून राहतात. अनेकदा त्यात पाल, उंदीर किंवा एखादा पक्षी मरून पडलेला असतो.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाच हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यामध्ये सुमारे १५ लाख लोकसंख्या वास्तव्य करत आहे. या टाक्यांची नियमित स्वच्छता न केल्याने विविध प्रकारचे आजार पसरतात. त्यामध्ये डायरिया, कॉलरा, गॅस्ट्रो की न्यूमोनिया, डेंग्यू असे आजार पसरतात. त्यामुळे वर्षांतून किमान दोन वेळा टाक्या स्वच्छ करणे गरजेचे आहे. वर्षातून दोनवेळा टाक्यांमधील पाणी काढून त्या स्वच्छ कराव्यात. टाक्यांमधील शेवाळ काढावे. टाकीमध्ये क्लोरिन पावडर टाकून टाकी एक तास बंद ठेवावी. त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून टाकी धुवून घ्यावी.
पाण्याच्या टाक्या साफ करणे आवश्यक आहे. मात्र, गृहनिर्माण संस्था याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक आजार पसरत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी टाक्या साफ कराव्यात.
– यशवंत डांगे, सहायक आयुक्त…