- शिव-फुले-शाहू-आंबेडकर, आपला महासंघ, लिपिक हक्क परिषद, शिपाई कर्मचारी संघटना आक्रमक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने पालिका कर्मचारी वर्गासाठी पुर्वीची धन्वंतरी आरोग्य योजना बंद करुन कॅशलेस विमा पॉलिसी लागू केले असल्याचे सांगितले आहे. परंतु एकाच महिन्यात या विमा पॉलिसीच्या गलथन कारभारामुळे व जाचक अटीमुळे दोनजणांचे बळी घेतले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून विमा पॉलिसी बंद करुन त्वरीत धन्वंतरी आरोग्य योजना लागू करण्याची मागणी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाने आयुक्त यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगपालिका सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी यांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू होती पण महापालिका आयुक्त यांनी ११ मार्च २०२४ रोजी रात्री १२ वाजल्या पासून धन्वंतरी योजना बद असल्याचे आदेश काडून मे.दि.न्यु इंडीया एशोरन्स कं.लि यांना कामकाज दिले. सुरवातीला कामगार वर्गामध्ये या पॉलिसी संदर्भात पुरेपूर माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध झाला नाही तरीही शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार कर्मचारी मंच, आपला महासंघ, लिपीक संवर्ग हक्क परिषद यांनी सातत्याने या पॉलिसीचा विरोध करुन जवळपास साडेचार हजार कर्मचारी वर्गाच्या सहयाचे निवेदन धन्वंतरीच्या समर्थनात औद्योगिक कोर्टामध्ये सादर केले होते. तरी देखील काही त्रुटी दाखवत न्यायालयाने देखील कर्मचारी महासंघाच्या बाजून निकाल देत विमा पॉलिसी लागू करण्यास वाट मोकळी करुन दिली. आणि येथूनच कर्मचीरी वर्गाच्या शारिरीक छळाला सुरवात झाली. सध्या मात्र या पॉलिसीच्या जाचक अटीमुळे कर्मचारी वर्गाचे मरण कर्माचीर महासंघाने व महापिलका प्रशासनाने स्वस्त केल्याची भावणा वाढीस लागत आहे.
धन्वंतरी योजनेसाठीच मी आग्रही, म्हणून कायदेशीर देखील लढाई लढतो आहे…
मी अध्यक्ष असताना पुर्वीच्या महासंघाने घेतलेल्या धन्वंतरी योजना बंद करण्याच्या निर्णयाला औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. पॉलिसी संदर्भात घेतलेल्या बैठकीत सुध्दा मी ठराव मांडून धन्वंतरी बंद करु नये उलट या योजनेती काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करुन धन्वंतरी योजनाच सुधारित पध्दतीने लागू करावी. तसेच खर्च वाढत आसेल असे वाटत असेल तर एक डॉक्टर वर्गाचे पथक स्थापन करुन ते रुग्णालयता दाखल झालेल्या कर्मचारी रुग्णाच्या उपचार खर्चाचा तपासणी करुन आवहाल तयार करावा असे अनेक हिताच्या सुचना केल्या होत्या. पण या सर्वाला जाणीव पुर्वक बगल देत कर्मचारी हित न पाहता स्वहित पाहणाऱ्या सर्वच घटकाकडून धन्वंतरी योजनेचा बळी दिला गेला व आता प्रत्येक कर्मचारी वर्गाचा त्यांच्या कूटुंबाचा बळी घेतला जात आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही.
– अंबर चिंचवड, आपला महासंघ…
हा तर मृताच्या मढ्यावरील लोणी खाण्याचा प्रकार..
आतापर्यंत धन्वंतरी योजनेसाठी वर्षाचा सरासरी खर्च हा कधीही पंधरा कोटीच्या पुढे गेला नाही. पण खर्चाचे कारण देऊन ही योजना बंद करुन विमा पॉलिसीठी चालु केली व एकाच वर्षासाठी सुमारे २७ कोटीचे बील अँडवान्स मध्ये अदा केले गेले. व बफर झोन पुन्हा ७ कोटी ठेवला आहे. म्हणजे ही योजना वर्षाला ३२ कोटीच्या पुढे झात आहे. तेव्हा महासंघ असेल किंवा महापालिका प्रशासन असेल तेव्हा त्यांना १७ कोटी रुपये जास्त देतो हे दिसले नाही का Ɂ तसेच महापालिकेने काढलेल्या आदेशात मे.दि न्यु इंडिया इंन्शोरन्स कं. लि या पोलिसीला काम दिले आसताना एमडी इंडीया ,या थर्ड पार्टीला काम दिले असून महापालिकेची देखील फसवणुक केली आहे. म्हणून महापालिकेने या कंपनीवर देखील फसवणूकीचा व यांच्या नाकार्तेपणामुळे कर्मचारी वर्गाच्या कुटूंबीयाचा गेलेला जीव पाहता सदोष वधाचा गुन्हा देखील नोंदविला पाहिजे. पण वरील सर्व प्रकार पाहता या योजनेत जवळपास १७ कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आमचा आरोप असून महापालिका आयुक्त यांनी या सर्वाच्या चौकशीसाठी समिती नेमूण ही योजना बंद करुन धन्वंतरी योजनाच चालु करावी.
– संजय जगदाळे – शिव,फुले,शाहू, आबेडकर विचार कर्मचारी मंच
विमा पॉलिसी म्हणजे कर्मचारी वर्गाचे एक प्रकारे शोषनच…
विमा पॉलिसीमुळे चतुर्थ श्रेणीमधील वर्गांचे शारिरी ,मानसिक शोषनाबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषन देकील केले जात आहे. मुळातच कर्मचारी वर्गाला कोणत्याही प्रकारे विश्वास न घेता व घाई घडबडीत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या सबंधी नविन कोणतीही निवीदा प्रक्रीया न राबवता पुर्वीच्याच कंपनीला काम दिले आहे. यामुळे शंकेला अने प्रकारे वाव मिळत आहे. तसेच कर्मचारी वर्गाचे या योजनेमुळे अतोनात नुकासान होत आहे.यामुळे ताबडतोप विमा पॉलिसी बंद करुन धन्वंतरी योजनेमध्येच सुधारणा करुन ती लागू करावी. नाहीतर प्रशासनाला कर्मचारी वर्गाच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.
– नागेश जाधव, समन्वयक – शिपाई संघटना