- लोकशाही आणि संविधानाला आज देशातील सर्वात गरीब लोकांनी वाचविले – राहुल गांधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जून २०२४) :- देशाला नरेंद्र मोदी आणि शाह नकोत, देशातील संविधानाला सर्वात गरीब लोकांनी वाचविले आहे. त्यात कामगार, शेतकरी, वंचित लोकांनी हे काम केले आहे. देशातील काही लोकांनी हे काम केले आहे. लोकांन केलेले वायदे पूर्ण करणार, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.
इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर ते आज मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आदी उपस्थित होते.
राहुल गांधी पुढे म्हणाले, इंडिया आघाडीतील घटक पक्षांना त्रास देण्यासाठी भाजपसह मोदी आणि शहा यांनी भारताच्या तपास संस्था, सरकारी संस्था, सीबीआय, ईडी, न्यायालय यावर कब्जा केला. त्यांना धमकावले. त्यामुळे अनेक पक्ष फुटले. लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती. आमचे बँक खाते गोठविले, मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले. संविधान वाचविण्यासाठी देशातील जनता एकत्र आली. कॉंग्रेसने इंडिया आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणले. त्यांना मदत केली. पारदर्शकपणा ठेवला. त्यांचा मान ठेवला. अदाणी आणि मोदी यांची भ्रष्ट रिलेशन लोकांना समजले. देशातील जनतेने मोदींना नाकारले. ही लढाई अशीच सुरु राहील. सर्वांचे आभार मानतो.
खर्गे म्हणाले, हा जनतेचा निकाल असून जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे. सध्या एकाही पक्षाला बहुमत नाही. मोदींची ही नैतिक हार आहे. कॉंग्रेस जाहीरनाम्याबाबत मोदींनी गैरसमज पसरविला. राहुल गांधींनी भारत जोडो आणि न्याय यात्रा काढली. लोकांच्या समस्या आणि त्यावर उपाय सुचविला. अहंकारी नेतृत्वामुळे भाजपची हार झाली आहे. दबावतंत्र आणि पक्ष फोडले, जेलमध्ये टाकले. मोदींना आणखी एक संधी दिली तर, संविधान आणि घटनेवर हल्ला करेल याचा लोकांना अंदाज आला. आता भाजप त्यापासून दूर राहील.