- एक लाखाच्या प्रचंड मोठ्या फरकाने डॉ. अमोल कोल्हे विजयी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जून २०२४) :- शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली.
पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. हि लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु जशा फेऱ्या होत गेल्या त्याप्रमाणे एकतर्फीच आघाडी दिसून आली आहे. सुरुवातीला अमोल कोल्हेना १८ ते २० हजारांचा लीड मिळालं होत. ते थेट लाखांच्या घरात पोहोचलं. १ लाखाच्या प्रचंड मोठ्या फरकाने डॉ. अमोल कोल्हे निवडून आले. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला.
अजित पवार गटाचे उमेदवार बारामतीत आणि शिरूरमध्ये पिछाडीवर होते. बारामतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. तर शिरूरमध्ये कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. दोन्हीकडे शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार अशी लढत झाली. त्यामुळे अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. अशातच कोल्हे यांनी फिल्मी स्टाईल मध्ये शेर टाकला. ‘धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही’ हे नक्की असं ते म्हणाले होते.
पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या कोल्हेंच्या मतांची आघाडी ९ व्या फेरी अखेर कोल्हेंची आघाडी ४४ हजारावर गेली. पुढे प्रत्येक फेरीत कोल्हे पुढेच राहिले. अमोल कोल्हे यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यांनी आधीच विजयाची खात्री दिली होती. शरद पवारांच्या विरोधात उमेदवार उभं करणे हे अजित पवारांना अवघड गेल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधत अर्ज भरण्याच्या वेळी लगावला होता. भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुर मधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार कोल्हे यांनी केला होता. त्याचाच प्रत्यय आज मतमोजणी वेळी आला.