न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या रावेत बंधा-यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अशुद्ध जल उपसा केंद्रातील काही पंपस् काही कालावधीसाठी बंद ठेवावे लागल्यामुळे पाण्याचा उपसा नेहमीपेक्षा कमी झाला आहे.
त्यामुळे शहरातील सर्व विभागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून आज बुधवार दि. २६ सप्टेंबर २०१८ रोजीचा पाणी पुरवठा विस्कळीत व कमी दाबाने राहणार आहे.
पाणी पुरवठा पुर्ववत करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग क्रियाशील असून नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या सह. शहर अभियंता पाणी पुरवठा व जलनिःसारण विभागाकडून करण्यात आले आहे.