न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव :- संघटनात्मक आढावा बैठका घेण्यासाठी आज शुक्रवार (दि. २६) रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चिंचवड गावातील वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, येत्या तीन नोव्हेंबर रोजी निगडीत पक्षाची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने पक्षास आगामी निवडणुकीसाठी वातावरण अनुकूल व्हावे, याकरीता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोमाने कामास लागावे व सभा भव्यदिव्य करावी, जेणेकरून लोकांना कळले की या मतदार संघात भाजपने बैठक का घेतली?
देशाचे पंतप्रधान कोणाला करायचे?
२०१९ ला देशाचा पंतप्रधान कोणाला करायचे? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला असता, कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला. ‘कोणाचाच आवाज निघत नाही, अशी भाजपा पूर्वी पहिली नव्हती’ असे म्हणत कार्यकर्त्यांच्या मौनावर दानवे यांनी संताप व्यक्त केला. यानंतर उपस्थितांनी मोदींचे नाव घेतले.
आयरामांचा भरणा
भाजपमध्ये आयारामांचा भरणा झाला आहे. राजकीय दिशा बदलल्यामुळे इतर पक्षातील बडे नेते भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांप्रमाणे आयाराम कार्यकर्त्यांना भाजपची संस्कृती समजली नसल्याची खंत दानवे यांनी यावेळी व्यक्त केली.
मंत्रीमंडळ विस्तार केंव्हा
पिंपरी चिंचवड शहराला संधी मिळेल का? असे विचारले असता, दानवे म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. योग्य व्यक्तिला मंत्रीपदाची संधी दिली जाईल. त्याची प्रक्रिया सुरु आहे.
पत्रकारांशी संवाद
युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होऊ नये, या विचाराचे आम्ही आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकप्रतिनीधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे.