न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१४ नोव्हें) :- भारत देश २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असतानाही या देशात अशीही काही माणसे आहेत, परिसर आहे की त्यांच्यापर्यंत अद्यापही काही सुविधा पोहचल्या नाहीत. आजही त्यांना दिवाळी सारखा सण साजरा करता येत नाही.
भिमाशंकर सारख्या दुर्गम भागातील आदीवासी पाड्यांवर आजही दिवाळी साजरी केली जात नाही. जिथे दिवसभराची चूल कशी पेटवायची तिथे दिवाळीचा आकाशकंदील कसा पेटणार. समाजभावना जपणारे समाजात असे काही समाजसेवक आहेत, की ते समाजापासून दूर असलेल्या या उपेक्षित घटकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी हा सण साजरा करतात.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेने मोशी येथील उद्योजक संतोष बारणे यांनी आमदार महेश लांडगे याच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच भिमाशंकर येथील आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील आदीवासी बांधवांच्या घरी भेट दिली. आपल्या प्रमाणेच दिवाळीमध्ये त्यांचेही तोंड गोड व्हावे, यासाठी बारणे कुटुंबीयांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी उद्योजक संतोष बारणे, नवनाथ बारणे, अतिश बारणे, शिवाजी बारणे, सचिन बा