न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ३० नोव्हें.) :- क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रहाटणी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन च्यावतीने संविधान जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व श्री. शिव छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, भारिपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इंजिनिअर देवेंद्र तायडे, मावळचे अध्यक्ष माउली सोनावणे, समस्त गावकरी मंडळ रहाटणीनीचे अध्यक्ष देवा अप्पा नखाते, रमेश नखाते, आबासाहेब पांढरे, विशाल जाधव, महिला अध्यक्षा कल्पना हालू, विजय जगताप, भगवान गोडांबे, बी. एस. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगणे, मा. पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
देवेद्र तायडे यांनी संविधानातील घटनेविषयी सखोल मार्गदर्शन केले. संविधानाचे पालन आणि रक्षण करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. आर्दश लोकशाहीचा राजमार्ग संविधानात दडलेला आहे. त्यामुळे जनतेला संविधान खूप महत्वाचे असल्याचे सांगितले.
मान्यवरांना संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या. राष्ट्रपिता यांच्या जयंती निमित्त फुल्यांच्या कार्याचा वसा घेतलेल्या समाज प्रबोधनकार शारदा मुंडे यांचा “मी सावित्रीबाई बोलते” हा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी रहाटणीतील जेष्ठ नागरिक आर. डी. भालेराव यांनी लिहिलेले आत्मचरित्र “माझे इंदू सदन” या पुस्तिकेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट २६/११ च्या शहीद जवानांना श्रध्दाजंली वाहून करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम भालेराव, गोरख रोकडे व आभार तात्या शिनगारे यांनी मानले.