न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- जेईई ॲडव्हान्स २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर हा विद्यार्थी देशात अव्वल आला आहे. आयआयटी मुंबई विभागातील हा विद्यार्थी आहे. एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती. पेपर १ आणि २ साठी एकूण ४३ हजार २०४ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स २०२० साठी पात्र ठरले आहेत.
चिराग फलोर हा ‘बाल शक्ती पुरस्कार’ विजेता आहे. जो पुरस्कार १८ वर्षाखालील भारतीय नागरिकांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे. चिराग फलोर हा या परीक्षेत कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर ठरला असून, त्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत.
तर, आयआयटी रुरकी झोनच्या कनिष्का मित्तल कॉमन रँक लिस्टमधील सतराव्या क्रमांकासह विद्यार्थीनींमध्ये अव्वल आहे. त्यांनी ३९६ पैकी ३१५ गुण मिळवले आहेत.