- सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (इडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.
या निर्णयाचा फायदा एसईबीसी वर्गात येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना होईल. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर लगेच त्या अनुषंगाने शासकीय आदेशही जारी करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर, २०२० रोजी मराठा आरक्षणाला दिलेला अंतरिम स्थगिती आदेशात विचारात घेऊन आजचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील विद्यार्थी / उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.