- ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ओलांडली नैतिकतेची पातळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हात सदस्यांचे अपहरण केल्याच्या घटना ताज्या असताना मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकासाठी अगोदर जादूटोणाचा प्रकार उघडकीस आला. तिघांच्या नावाने झाडाला लिंबू ठेऊन खिळे ठोकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विद्यमान सदस्य अविनाश मारुती असवले यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीजवळ भैरवनाथ मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाला झाडाला अविनाश असवले, भूषण असवले व ऋषीनाथ शिंदे यांच्या नावाने पोलिसांन लिंबाला खिळे ठोकून झाडाला लावले फलक होते. ही माहिती समजल्यावर शिवाजी असवले, इतर जण पाहण्यासाठी गेले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिघांचे फलक काढून नदीत फेकून दिले. समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
टाकवे बुद्धक ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. सरपंचपदाचे आरक्षण खुला पुरुष वर्गासाठी आहे. सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १३ पैकी ९ सदस्य बाहेरगावी गेले आहेत. किती लिंबू, खिळे ठोकले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचाच सरपंच होणार असे शिवाजी असवले म्हणाले.
टाकवे येथे एकहाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची आली आहे. आमचे १३ पैकी काही सदस्य बाहेर गेले आहेत. कितीही जादूटोणा केला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचाच सरपंच होणार आहे, यात शंका नाही. हा प्रकार सरपंच, उपसरपंच पदासाठीच केला असावा. जागेवर जाऊन ती लिंबे काढून नदीत फेकली आहेत. तक्रारी अर्जावरून चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे हवालदार बी. जी. कर्डीले यांनी सांगितले.