- लेखी परीक्षेनंतर होणार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- राज्यातील औरंगाबाद, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे कठीण मानले जात आहे. पालक, शिक्षकांनीही त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घ्याव्यात आणि त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारू नये, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सर्व शाळांना दिल्या.
शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या…
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांच्या पेपरमध्ये असणार पुरेशा दिवसांचे अंतर
प्रतिबंधित क्षेत्र व लॉकडाउन तथा कोरोनाचा वाढलेल्या प्रादुभार्वामुळे लेखी परीक्षानंतर होणार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा
पालकांनी परीक्षा व विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे सूचना पाठवाव्यात
सह्याद्री वाहिनीवरील दहावी-बारावीच्या तासिका वाढणार;➖अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मिळेल प्रश्नसंचिका
पालक संघटना, शिक्षकांनी शासनासोब एकत्रित येऊन परीक्षा घेण्यासंदर्भात ठोस नियोजन करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला नसल्याने शाळा आणखी काही दिवस बंदच ठेवण्यात येणार आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे वर्ग सुरु ठेवण्यात आले आहेत.