- प्राधिकरणाच्या मुद्द्यावरून भाऊसाहेब भोईरांकडून सत्ताधारी लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून त्यातील भाग महापालिकेत वर्ग केला. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. विलनीकरणावरुन प्राधिकरणात असणारी सत्ताधाऱ्यांची दुकानदारी बंद झाल्याने महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. विलीनीकरणावरून भाजपाने टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
विलास लांडे म्हणाले, “ सत्ता असताना जनहिताचा निर्णय घेता आला नाही;मात्र महाविकास आघाडीने निर्णय घेतल्यानंतर त्रास होत आहे. भाजपाचे नेते थोतांड आहेत.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ” बिल्डरधार्जिणा निर्णय म्हणणे चुकीचे आहे. त्यातील बिल्डर कोण? हे सगळ्यांना माहीत आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्यावर निवडणुका जिंकल्या. पाच वर्षे भाजपाची सत्ता होती. तुम्ही काय केले, ते जनतेला सांगा.
प्रशांत शितोळे म्हणाले, ” प्राधिकरणाच्या विषयावर विरोधक राजकारण करीत आहेत. आमच्याकडून आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षात गेलेल्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची सत्ता असताना का निर्णय घेतला नाही.
प्राधिकरणात येऊन तत्कालीन मुख्यमंत्री यांनी प्राधिकरण बरखास्त करू असे आश्वासन दिले होते. मात्र निर्णय घेतला गेला नाही. आघाडीने निर्णय घेतल्याचा फायदा नागरिकांना होईल, आपल्याला श्रेय मिळाले नाही म्हणून टीका करणे अयोग्य आहे, असा टोला हाणला. प्राधिकरणात कोणाची दुकानदारी होती. ते सर्वांना माहीत आहे. ती बंद झाल्याने टीका केली जात आहे, असेही विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले.