न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- जगगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढीवारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहूगाव व परिसरात २८ जून ते ४ जुलै या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे.
श्री क्षेत्र देहूगाव येथून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलै रोजी दुपारी दोनला छत्रपती संभाजीराजे भोसले याच्या उपस्थितीत श्री संत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादूर्भाव पाहता तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शासनाने पालखी प्रस्थान सोहळा आषाढी पायीवारी सीमित करून प्रतिकात्मक स्वरूपात व्हावी, याकरिता १४ जूनला १०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत परवानगी दिलेली आहे.