न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- भारतामध्ये यापुर्वी कॉलरा महामारीची साथ आली होती. तेंव्हा देखिल तत्कालीन सरकारने पालखी सोहळ्यावर एवढी बंधने घातली नव्हती. परंतू महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातशे वर्षांची परंपरा असणा-या पालखी सोहळ्यावर जाचक नियम अटी घातल्या आहेत.
हे निर्बंध उठवावेत व हभप बंडातात्या कराडकर आणि इतर वारक-यांना नजरकैदेतून मुक्त करावे या मागणीसाठी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात टाळ वाजवून वारक-यांनी, व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिका-यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा जयघोष करीत आंदोलन केले.
या आंदोलनात हभप मनोहर बुवा सुभेकर, विश्व हिंदू परिषदेचे चिंचवड जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे, चिंचवड अध्यक्ष शरद इनामदार, विभागमंत्री नितीन वाटकर, बजरंग दलाचे कुणाल साठे, जिल्हा मंत्री संजय शेळके, कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, हभप शिवाजी महाराज इंगळे तसेच अभिजीत शिंदे, नाना सावंत, संभाजी बालघरे, सागर चव्हाण, नंदकुमार कुलकर्णी, अमोल नाणेकर, ओंमकार कुंभार, प्रज्ञा सावंत, भक्ती साळवी आदींनी सहभाग घेतला होता.