- आता दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी कपात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात फक्त १७.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेने आवश्यक पाऊले उचलून पाणी कपात करावी, असे पत्र पाटबंधारे विभागाच्या वतीने महापालिकेला (दि. २९) रोजी आले आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा उन्हाळ कडक होता. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले होते. तसेच पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणी पातळी १७.७९ टक्यांवर आली आहे. गतवर्षी धरण परिसरात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे धरणात २९ जूनअखेर ३५ टक्के पाणीसाठा होता. पावसाळा सुरू होऊनही अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने शहरावर पाणी कपातीचे संकट आले आहे. त्यामुळे आता दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी कपात पालिका करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेने आवश्यक ती पाऊले उचलून पाणी कपात करावी, असे पत्र पाटबंधारे विभागाचे आले आहे. वरिष्ठ स्तरावर बैठक होईल. त्यानंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल.
– रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग…