न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने जनजागृतीसाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून काळेवाडी येथील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीर या शाळेने प्रभात फेरी काढली.
ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. तिरंगा है मेरी जान, भारत देश मेरा महान, भारत मातेचे सेवक आम्ही, तिरंग्याचे रक्षक आम्ही, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महात्मा गांधी,डॉ बाबासाहेब आंबेडकर , सुभाषचंद्र बोस, भारतमाता, शिवाजी महाराज, संत तुकाराम, क्रांतिकारी, सैनिक,पोलीस यांच्या वेशभूषा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळाचे सचिव मल्हारीशेठ तापकीर,केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट चे उपाध्यक्ष विवेक तापकीर, कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार व मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते. प्रभात फेरीचे नियोजन उपशिक्षिका उल्का जगदाळे, पुनम कांबळे, रविंद्र बामगुडे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.