न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली :- देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे चोर निघाले, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
इतिहासात पहिल्यांदाच फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानांना अशा प्रकारे चोर ठरवतायत. हा त्या पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पंतप्रधान यावर एक शब्द का बोलत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, एकवेळ संरक्षण मंत्री बोलतील, अरूण जेटली ब्लाँग लिहीतील. पण पंतप्रधानांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही, असंही ते म्हणाले