न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- ‘रिक्षात टेपचा जोरात आवाज का केला आहे, तु आम्हाला ओळखतो का’, अशी आरोपी चौघांनी फिर्यादीला विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना काय झाले? असे विचारले. त्या कारणावरून चिडुन जात आरोपी चौघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
तेवढ्यात आरोपी क्र. १ याने तेथे पडलेला फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यास, कपाळावर मारुन त्यांना जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २) रोजी रात्री ८.०० वाजता शिवाजी विद्यालय, मांजरे स्टिल दुकानाजवळ, चाकण येथे घडली.
फिर्यादी रिक्षाचालक जीवन विक्रम जाधव यांनी आरोपी १) अमोल विश्वनाथ लाटकर (वय २७ वर्षे रा एकतानगर चाकण), २) पराग बबन गायकवाड (वय २० वर्षे रा खंडोबामाळ, चाकण), ३) विवेक कु-हाडे, ४) विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ७०२/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ व २ यांना अटक केली आहे. पोना चव्हाण तपास करीत आहेत.










![[चाकण]:- टेपचा जोरात आवाज का केला म्हणून चौघांची रिक्षाचालकाला मारहाण...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-2-90x60.jpeg)



