न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जळगाव (दि. ०४ जून २०२४) :- निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रांमधील बॅटरी ही ९० टक्के चार्ज असल्याची बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम यंत्रावरच आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे रावेरची मतमोजणी थांबविण्यात आली आहे.
श्रीराम पाटील म्हणाले यांनी, मतमोजणी यंत्रातील बॅटरी ही ९९ टक्के कशी असू शकते, दिवसभर यंत्रात मतदान झाले. एवढे असूनही मतदान यंत्रातील फक्त एक टक्का चार्ज कसे कमी होऊ शकते? असे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे रावेर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी थांबली आहे.