न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२४) :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषढीवारी पालखी सोहळ्याचे अहीर सुवर्णकार समाजाच्या वतीने खराळवाडी येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना २५० किलो राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष भगवान वानखेडे, उपाध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार, सदस्य दीपक सोनार, सुनील निकुंभ, कैलास पैठणकर, प्रवीण दुसाने, महिला सदस्य स्मिता सोनार, प्रियंका सोनार, इंद्रायणी जाधव, पल्लवी दुसाने, स्वाती सोनार, नयना वानखेडे, नीलम सोनार तसेच राहुल सोनार, उमेश सोनार, घनश्याम वानखेडे, निलेश जाधव, महेंद्र सोनार आदी उपस्थित होते. यावेळी अहीर सुवर्णकार समाज भक्ती रसात तल्लीन झाला होता.
दरवर्षी हा पालखी सोहळा वारीच्या स्वरुपात पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे अवघ्या वारकऱ्यांच्या समवेत हरिनामाचा गजर करत अभंग गात पायी प्रवास करत असतो. एकता, सद्भावना, आणि मानवतेचा संदेश देत वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका घेऊन विचारांची शिदोरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतो. या वारीमध्ये बळीराजाचा सहभाग अधिक प्रमाणात असतो. यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत अहीर सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आले, अशी माहिती संतोष सौंदणकर यांनी दिली.