वैजापूर : बाबतरा (ता. वैजापूर) येथील दोन शाळकरी मुलांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.27) सकाळी नऊच्या सुमारास घडली. या मुलांचा शोध पोलिस, अग्निशमन दल व महसुल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तुषार सतिश गांगड (वय 14) व विवेक कालीचरण कुमावत (वय 15, रा. बाबतरा, या.वैजापूर ) असे मृत शाळकरी मुलांची नावे आहेत. दोघेही सोमवारी सकाळी येथील नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.